धामणगाव रेल्वे

ग्राहकांचा संयम तुटला, हक्काचे पैसे भेटत नसल्याने बँकेतच सुरु केला ठिय्या

धामणगाव येथील निर्मल उज्वल बँक चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर ?

धामणगाव रेल्वे –

येथील निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मध्ये काही महिण्यापुर्वी ग्राहकांचे तारण ठेवलेले सोने परस्पर लंपास केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा बँक चर्चेत आली आहे. ती म्हणजे ग्राहकांना आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने चक्क बँक मधेच जवळपास ३० ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कष्टाची रक्कम भविष्यात आपल्या कामी पडणार या विश्वासाने बँकेत ठेवी म्हणून ठेवली असताना ठेवी ( एफ डी ) चा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पैसे परत करण्यात बँकेकडून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात आला तर काहींच्या मते सेविंग खात्यामधील विड्रॉल देण्यासही बँक असमर्थ असल्याचे सांगण्यात आले.

ठेवीची मुदत संपली असतानाही ग्राहकांना पैसे नाही

२ ते ३ महिन्यापूर्वी ठेवी पूर्ण झाली असतानाही अद्यापही ग्राहकांना पैसे मिळत नाही. ठेवी वर लोन सुद्धा मिळत नसल्याने, तसेच स्वतःच्या पैशाची मागणी करीत असतानाही फक्त आणि फक्त उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याने आज ग्राहकांचा संताप अनावर झाला असल्याने बँकेतच ठिय्या आंदोलनाचा पवित्रा नागरिकांकडून घेण्यात आला आहे. बँकेत कुठलाही जबाबदार व्यक्ती नसल्याने बँकेत ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले आहे.

महिलांसह जेष्ठ नागरिकांचा बँकेत ठिय्या सुरु

३० ठेवीदारांनी आज बँकेत ठिय्या सुरु केला असून त्यांच्यामते जवळपास १ कोटी ५० लक्ष रुपयांची आमची ठेवी पूर्ण झाली असतानाही बँकेच्या सतत चकरा आम्हाला माराव्या लागत आहे. सध्यस्थित पेरणीचे दिवस असताना, शिक्षणाचे सत्र सुरु होत असताना मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले आमचेच हक्काचे पैसे मिळत नसल्याने बँकेकडून पूर्णतः ग्राहकांची गळचेपी करण्यात येत असल्याचा आरोप उपस्थित ठिय्या आंदोलन करणाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
सदर ठिय्या आंदोलनासंदर्भात बँकेतील मॅनेजर याना विचारणा केली असता मला फक्त दोन दिवसांसाठी इथला चार्ज मिळाला आहे. या मधली काहीही माहिती माझ्याकडे नाही म्हणून एका महिला अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे जर बँकमधील मॅनेजर ला या प्रकरणाविषयी काही माहिती नसेल तर या पेक्षा बँकेचे दुर्दैव किती असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. दरम्यान जोपर्यंत आम्हाला आमचे हक्काचे पैसे मिळत नाही, अथवा ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यानी केला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!