धक्कादायक धामणगाव रेल्वे

उष्माघातामुळे पिंपळखुटा येथील शेत मजुराचा मृत्यू

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील पिंपळखुटा येथे उन्हामुळे एका शेत मजुराचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि. ०४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण उके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. रविंद्र देविदास उके, वय ४२ वर्ष, रा. पिंपळखुटा असे मृतक शेतमजुराराचे नाव आहे.
मृतक रविंद्र देविदास उके हे पिंपळखुटा येथील रहिवासी असून घरची परिस्थिती हलाखीची असताना पत्नीसह मिळेल ते काबाड कष्ट करून आपल्या दोन मुलांसह कुटुंबाचा गाढा ओढत होते. घराचा कर्ता व्यक्ती असा अचानक कायमचा निघून गेल्याने मोठे संकट कुटुंबावर ओढवले आहे. मृतक रविंद्र उके यांनी काल दिवसभर उन्हात काम केल्याने घरी परतल्यापासून त्यांना छातीत दुखणे, गरगरण्यासारखा त्रास जाणवायला लागला होता. रात्री ३ वाजता अचानक छातीत दुखायला लागल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनात एएसआय धनंजय झटाले हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.
मृतक रविंद्र देविदास उके यांच्या मागे पत्नी देव्यांनी उके वय ३७, मुलगा नितीन उके वय १६, तर मुलगी गुंजन उके वय १३ वर्षे असा आप्त परिवार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!