आमदार उमेश यावलकर यांची यशस्वी मध्यस्ती
वरुड प्रतिनिधी – निलेश निंबाळकर
अखेर…. ४ दिवसानंतर प्रशासनाने नमते घेत अनेक मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरित मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याशी बैठक आयोजित करून ताडगा काढण्याचे लेखी आश्वासन तसीलदारांच्या हस्ते मिळाल्याने आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. तब्बल ४ दिवसानंतर सायंकाळी ११:३० वाजता तहसीलदार राम शेळके यांच्या उपस्थितीत या आंदोलनाचा तोडगा काढण्यात आला. विधानसभेचे विद्यमान आमदार चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांनी यशस्वी मध्यस्थी करून संपूर्ण विषयावर चर्चा केली. त्यांना क्रांतीज्योती ब्रिगेडचे नेते मा. अशोकजी देवते यांनी सक्रिय पाठिंबा देत महत्त्वाची भूमिका निभावली. तहसीलदार साहेब राम शेळके यांनी सर्व मागण्यांबाबत लेखी स्वरूपात पत्र दिले, जे उपोषणकर्ते अविनाश भाऊ बिसांद्रे व राहुल भाऊ लांडगे, पंजाबरावजी ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. अनेक मागण्या तात्काळ मान्य झाल्या असून, उर्वरित मागण्यांसाठी येत्या २६ सप्टेंबर, शुक्रवार रोजी सर्व संबंधित उपजिल्हाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.














Add Comment