घरकुल, सिंचन विहीर, स्वच्छता भारत मिशन भ्रष्टाचार प्रकरण
धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी
मागील अनेक दिवसापासून या ना त्या कारणाने चर्चेचा विषय बनलेल्या ग्रा. प. तळेगाव दशासर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. विविध योजनेमधून झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून त्याची चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ज्यामध्ये घरकुल, सिंचन विहीर, स्वच्छता भारत मिशन टप्पा १ चा समावेश आहे. या संदर्भात चौकशी करून कारवाई व्हावी म्हणून ठराव मंजूर असतानासुद्धा प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊले न उचलल्याने शेवटी गावातील नागरिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपोसले आहे.














Add Comment