धामणगाव रेल्वे

स्मशानभूमी शेडच्या कामावरून तळेगाव दशासर येथे तुफान राडा ! प्रकरण पोहोचले थेट पालकमंत्र्याकडे

जि. प. माजी सदस्य, सचिवांसह, नागरिकांची परस्परविरोधी पोलिसात तक्रार

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

तालुक्यातील तळेगाव दशासर ग्रा. प. मध्ये दि. २३ मे रोजी कोरम अभावी तहकूब झालेल्या आमसभेत सरपंच पतीने राडा केल्याची घटना ताजी असतानाच तहकूब सभा दि. ३० मे रोजी घेतली असता त्यामध्ये सुद्धा विविध मुद्द्यांवरून वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले तर सभा आटोपल्यानंतर स्मशानभूमीच्या शेडचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत सचिवाला पाहण्यासाठी नेले. सदरचे काम नित्कृष्ठ दर्जाचे झाले असताना आपण ठेकेदाराचे पेमेंट का काढले या मुद्द्यांवर शाब्दिक वादावादी झाली त्याचेच रूपांतर शिवीगाळ आणि लोटालोटीमध्ये रूपांतर झाल्याने स्मशानभूमीतच तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.
              याप्रकरणी ग्रा. प. सचिव काळमेघ यांनी कामात व्यत्यय आणणे, शिवीगाळ करणे, लोटालोटी करणे, धमक्या देणे, जबरदस्तीने सभेच्या जागेवरून स्मशानभूमीत नेल्याची पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे त्यावरून एकूण सहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जि. प. माजी सदस्य सौ. अनिता मेश्राम यांनी सुद्धा धमकी देणे, शिवीगाळ करण्याची तक्रार पोलिसात केली आहे. तसेच अजय हटवार यांनी सुद्धा सरपंच मीनाक्षी ठाकरे, जि. प. माजी सदस्य सौ. अनिता मेश्राम, ग्रा. प. सचिव, सदस्य अन्य एक यांच्या विरोधात व्हिडीओ शूटिंग करीत असताना अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याची पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.

तळेगाव ग्रामपंचायत चे प्रकरण पोहोचले पालकमंत्र्यांकडे

घडलेल्या या सर्व प्रकारानंतर सदरचे प्रकरण हे थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रारीच्या माध्यमातून देण्यात आले. त्यामध्ये तळेगाव दशासर येथील समस्त नागरिकांच्या वतीने गावात मोठ्या प्रमाणात घरकुल घोटाळा झाला असून तो विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी मांडला असून गावात सुरु असलेल्या कामाबाबत सचिवाला पाहण्यासाठी घेऊन गेले असता सरपंच तसेच सदस्यांनी वाद घालत काही कार्यकर्त्यांना मारहाण करून तसेच सचिवाला शस्त्र बनून नागरिकांवरच गुन्हे दाखल केले असल्याचे नमूद आहे. तसेच १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला सुद्दा सरपंचाच्या वतीने मारहाण केली असून सदर ग्रामपंचायतीचा घोटाडा उघडकीस आल्यामुळे हे लोक कोणावरही आरोप करून त्यांना फसवू शकतात, त्यामुळे आपल्या स्तरावरून चौकशी लावून समस्त नागरिन न्याय द्यावा अशी मागणी पालकमंत्री याना करण्यात आली आहे..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!