धामणगाव रेल्वे –
आजचे सान सान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील गावाचा देशाचा पांग फेडतील उत्तम गुणांनी या कलियुगाच्या काळात आजचा तरुण मोबाईल टीव्ही च्या नादात दिशाहीन झालेला आहे, त्यामुळे त्याच्या मनावर सतत कुसंस्कार पडत असून आज समाजात चोरी व्यसनाधीनता बलात्काराचे प्रमाण वाढत आहे मुले आई-वडिलांचे ऐकत नाही. रात्री घरी उशिरापर्यंत येऊन बारमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ घालत आहे. त्या तरुणाला दिशा द्यायची असेल तर आज राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला तरुण जो निर्व्यसनी असेल, राष्ट्रप्रेमी असेल शरीराने धाड धाकट घडवायचा असेल तर आज सुसंस्कार शिबिरातूनच तो विद्यार्थी घडते. कारण सुसंस्कार शिबिरामध्ये आदर्श दिनचर्या असते विविध विषयाचे बौद्धिक दिले जाते.
त्यामुळे विद्यार्थी मनावर चांगले संस्कार होते बंधुप्रेम, आई-वडिलांची सेवा गाडगे बाबांची दशसुत्री, राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्य, भगवद्गीता ग्रामगीता, रामायण, इत्यादी ग्रंथाचा अभ्यास सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विविध गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो. आदर्श थोर पुरुषांचे चरित्र, संतांचे चरित्र विद्यार्थ्यांच्या बालमनावर परिणाम करून जातात म्हणून आज संस्कार शिबिराची काळाची गरज आहे. असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले.















Add Comment