धामणगाव रेल्वे
युवकांसमोर सध्या आव्हानांचा डोंगर आहे. या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर महामानवांचे चरित्र, त्यांचा इतिहास आत्मसात करणे आवश्यक आहे. महापुरुषांचे चरित्र आत्मसात केल्यास त्यातून आव्हानांना पेलण्याची प्रेरणा मिळू शकते, असे प्रतिपादन वर्धा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रफुल क्षीरसागर यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने धामणगाव रेल्वे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी दिनांक १७ मे २०२६ रोजी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मराठा सेवा संघ प्रणित संभाजी बिग्रेड च्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रमाता जिजाऊ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.विलास जाधव होते. प्रमुख पाहूणे म्हणून संभाजी ब्रिगेड चे जिल्हाउपाध्यक्ष गजानन मानकर, तालुकाध्यक्ष सुयोग ठाकरे , विद्यार्थी आघाडी चे अध्यक्ष मानस बोरघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.















Add Comment