धामणगाव रेल्वे

संघर्षावर मात करत स्वअभ्यासातून घडवले यश ; इश्वरी जायलेची प्रेरणादायी झेप

धामणगाव रेल्वे

प्रतिकूल परिस्थिती, अपुऱ्या सुविधा आणि अनेक अडचणींच्या छायेतही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण वाठोडा बु. येथील इश्वरी गौरव जायले हिने घालून दिले आहे. ट्युशनचा आधार न घेता केवळ स्वअभ्यासावर विश्वास ठेवत तिने दहावीच्या CBSE परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले असून माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागातील साध्या कुटुंबात वाढलेल्या इश्वरीसाठी शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. दररोज शाळेसाठी अप-डाऊन करताना रस्त्यांची अपुरी व्यवस्था, वेळेचे बंधन आणि शारीरिक थकवा यांचा सामना तिला करावा लागत होता. मात्र या सगळ्या अडथळ्यांना न जुमानता तिने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले.
नियमित अभ्यास, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास या बळावर इश्वरीने हे यश संपादन केले. तिच्या या प्रवासात आई-वडील आणि शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन तिच्यासाठी आधारस्तंभ ठरले. इश्वरीचे हे यश केवळ गुणांपुरते मर्यादित नसून, प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानण्याची प्रेरणा देणारे आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व सहाध्यायी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इश्वरी जायलेची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून “मेहनत आणि जिद्द असेल, तर यश नक्कीच मिळते” हा संदेश देऊन जाते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!