नागरिकांची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार
धामणगाव रेल्वे
तालुक्यातील गट ग्रा. प. जळगाव आर्वी अंतर्गत रामगाव येथे नालीचे बांधकाम सुरु असून त्यात अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असल्याचे नागरिकांची ओरड आहे. रेती ऐवजी सर्रास डस्ट चा वापर, नित्कृष्ठ दर्जाचे सिमेंट ठेकेदार आपल्या मानमर्जीप्रमाणे टाकत असून सदरील नालीचे बांधकाम जास्त काळ टिकणारे नसून नागरिकांना परत त्याच समस्या उद्भवणार असल्याचे मत काही नागरिकांनी मांडले आहे. तर या संदर्भात सदरच्या कामाची तक्रार गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली असून त्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे… तक्रारीवर अजय तुपसुंदरे, मंगेश मडामे, सुनील पाटील, राहुल बन्सोड सह इतर नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.














Add Comment