पालकमंत्री बावनकुळे यांच्या आदेशालाही केराची टोपली — सीईओवर प्रश्नचिन्ह
अमरावती | प्रतिनिधी
अचलपूर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात गेल्या तीन वर्षांपासून एकाच अधिकाऱ्याचा ‘प्रभारी’ म्हणून कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत ही नियुक्ती कायम ठेवली गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शासनाच्या नियमानुसार व काही तज्ञ मंडळींच्या सांगण्यावरून प्रभारी अधिकारीचा कार्यकाळ कमाल ३-६ महिने मर्यादित असावा(केंद्र शासनाचे मार्गदर्शक नियम (Fundamental Rule 49 – FR-49). मात्र, शाखा अभियंता नितीन झगडे यांना सलग तिसऱ्या वर्षीही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भात माहिती मागितली असता जिल्हा परिषद कार्यालय उडवा उडवी चे उत्तर दिल्याचे उघड झाले आहे.
“फाईल दोनदा मागवली, तरी कारवाई नाही!” — सीईओवर टीका
स्थानिक नागरिक व जनप्रतिनिधींनी या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्याकडे केली होती. पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनावर पक्षपात आणि “मॅनेजमेंट”चे आरोप होत आहेत.













Add Comment