महाराष्ट्र शैक्षणिक

उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी ! शिक्षकांना मात्र यावे लागणार शाळेत

६ मे पर्यंत शिक्षकांना बजावी लागणार दिवटी

जनसूर्या मीडिया :

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय शिक्षकांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज शालेय विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राचा शेवटचा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ आज संपणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आज २५ एप्रिल २०२५ रोजी समाप्त होतील आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजेच २६ एप्रिल पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात होता आणि यंदा उन्हाळी सुट्ट्या उशिराने का लागत आहेत यामुळे नाराजी पाहायला मिळत होती.
वाढत्या तापमानामुळे पालक चिंतेत होते मात्र आता पालकांची ही चिंता दूर होणार आहे कारण की उद्यापासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहेत. मात्र असे असले तरी शालेय शिक्षकांना मे महिन्यात सुद्धा शाळेत यावे लागणार आहे. उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी लागू होईल आणि शिक्षकांची उन्हाळी सुट्टी ६ मे २०२५ पासून सूरु होणार आहे. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षात शाळेला कधी सुरुवात होणार, उन्हाळी सुट्ट्यानंतर शाळा कधी सुरू होणार याबाबत सुद्धा मोठी माहिती समोर येत आहे.
आज शुक्रवार चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शाळेचा शेवटचा दिवस राहणार आहे. २६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागतील आणि १ मे २०२५ रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा शिक्षकांना काही दिवस शाळेत यावे लागणार आहे. खरे तर आज विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर आहे आणि त्यानंतर एक मे ला निकाल लागेल यामुळे शिक्षकांना आता या दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांचे पेपर तपासावे लागणार आहेत आणि त्यांचे प्रगतीपत्रक रेडी करायचे आहे. यामुळे उद्यापासून शालेय शिक्षकांची मोठी धावपळ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे एक मे रोजी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा पुढील चार दिवस शिक्षकांना शाळेतच यावे लागणार आहे. त्यानंतर मग ६ मे २०२५ पासून शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. खरेतर, रमझान ईद आणि वेळ आमवस्येची सुटी कामाच्या दिवशी घेतल्याने शिक्षकांची उन्हाळी सुट्टी यंदा थोडी लांबली आहे, शिक्षकांची उन्हाळी सुट्टी दोन दिवस उशिराने सुरू होत आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पद्धत बदलली

खरे तर, दरवर्षी एप्रिलचा पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा घेतली जात असते मात्र यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली आहे. यावेळी पहिल्यांदाच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्र परीक्षेला सुरुवात झाली आणि २५ एप्रिल २०२५ पर्यंत ही अंतिम सत्र परीक्षा आयोजित करण्यात आली. आज मात्र विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा समाप्त होईल आणि उद्यापासून त्यांना सुट्टी लागेल.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी होणार ?

जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शालेय विद्यार्थ्यांना उद्या २६ एप्रिलपासून तर शिक्षकांना ६ मे पासून उन्हाळी सुट्या लागू होतील. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ जून २०२५ रोजी नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ ला सुरुवात होईल आणि हा दिवस शाळेचा पहिला दिवस असेल.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!