देश सामाजिक

४०० एकर जंगलतोडीवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं ; जसं होतं तसं जंगल करा- आदेश

जनसूर्या मीडिया

हैदराबाद विद्यापीठ परिसरातील ४०० एकर जंगलात करण्यात आलेल्या वृक्षतोडीवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलीय. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटलं की, इथं आधी जसं होतं तसं जंगल करावं लागेल
हा परिसर जंगलासारखा आहे आणि हैदराबादचं फुफ्फुस म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी औद्योगिक वसाहतीसाठी वृक्ष तोड करण्यात आली होती. याच्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. जंगलातला व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. यात जंगलात वृक्षतोडीनंतर पशु-पक्ष्यांचे ओऱडण्याचे येणारे आवाज आणि इकडे-तिकडे धावणारे प्राणी दिसत होते.
हैदराबादमधील या वृक्षतोडीनंतर पर्यावरणवाद्यांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. झाडं अशी तोडली नाही पाहिजे यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने पुन्हा जशी होती तशी स्थिती निर्माण करावी असे आदेश दिले आहेत.
तेलंगना सरकारला फटकारताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, १०० एकर जमीनीवर आधीसारखी स्थिती करण्यासाठी प्लॅन तयार करा. झाडं तोडण्यासाठी घाई का केली असा प्रश्नही उपस्थित केला. पर्यावरणाला जी हानी पोहोचवण्यात आलीय त्यामुळे चिंता वाटतेय असंही सर्वोच्च न्यायलयाने म्हटलं.
व्हायरल व्हिडीओमध्ये पशु-पक्षी आश्रयासाठी पळताना दिसतायत. जंगली प्राण्यांची सुरक्षा कशी करायची ते तुम्ही बघा. त्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पावलं उचला. झाडांची कत्तल केली जातेय आणि पशु-पक्षी आश्रयासाठी धावतायत हे मन हेलावणारं दृश्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.
वृक्ष तोडीवर सर्वोच्च न्यायालयाने विकास प्रकल्प राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सुनावलं. विकास प्रकल्प किंवा इतर कोणतेही कारण देत झाडं लावण्यास विरोध केला तर त्या अधिकाऱ्यांना तिकडेच जेल बांधून डांबलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!