तालुका प्रतिनिधी (अमळनेर)
समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी समजूत आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे या गावाने एका ऐतिहासिक आणि पुरोगामी घटनेचा अनुभव घेतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सहा मुलींपैकी एक असलेल्या मंगलाबाई भीमराव मेराळै यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी देऊन एक नवा इतिहास रचला आहे.














Add Comment