धक्कादायक धामणगाव रेल्वे

अज्ञाताने ४० क्विंटल चण्याची गंजी जाळली ; आठवड्यातील दुसरी घटना

शेतकऱ्याने मक्त्याने केली होती शेती ; २ लाखांचे नुकसान

धामणगाव रेल्वे 

मागील एका आठवड्यात सातत्याने दोन शेतकऱ्याच्या शेतातील कापून ठेवलेल्या चण्याच्या गंजी ला आग लावल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवस रात्र काबाडकष्ट कष्ट करून शेतकरी शेतात पीक तयार करतो मात्र पीक अंतिम टप्यात असताना ते काढून आपल्या पदरी पडणार त्या अगोदरच होत्याच नव्हतं होत आणि संपूर्ण वर्षभर केलेली मेहनत, लावलेला पैसे, पाहिलेले स्वप्न एकात क्षणात हिरावले जाते. माणूस इतका निर्दयी कसा होऊ शकतो कि, रागाच्या भरात नको ते कृत्य करून माणसालाच माणसाची चीड निर्माण होताना दिसत आहे.
नुकताच काही दिवस अगोदर तालुक्यातील कामनापूर घुसडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील चन्याच्या गंजीला आग लावल्याची घटना ताजी असतानाच तसाच काहीसा प्रकार तालुक्यातील झाडगाव शेत शिवारात घडला आहे. एका शेतकऱ्याने मक्त्याने केलेल्या शेतातील अंदाजे ४० क्विंटल चन्याची गंजी अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतकरी अरुण पंजाबराव ढोके वय – ५५ रा. झाडगाव ता. धामणगाव रेल्वे यांचे जवळपास २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान मंगरूळ द. पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएस ३२६ फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!