धामणगाव रेल्वे सामाजिक

सर्वसामान्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेसचे तहसील कार्यालयावर धडक आंदोलन

दिलेल्या मागण्यांवर ठोस पावले न उचलल्यास तहसीलच्या आत ठिय्या आंदोलन करणार – वीरेंद्र जगताप, माजी आमदार

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी आज रोजी तहसील कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. या मध्ये निवडणुकीपूर्वी राज्यकर्त्यांनी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकरी कर्जमाफी व नियमित कर्जदारांना प्रोत्साहन रक्कम द्यावी, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती, बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचे रखडलेले अनुदान, त्वरित वाटप करावे, घरगुती तसेच शेतीपपंचा वीजपुरवठा सुरळीत करावा, निवडणूक आधी उद्घाटन केलेले पांधन रस्ते चे कामे त्वरित सुरू करावे, तसेच मुख्य मार्गावरून गावा गावाला जोडणारे रस्ते दुरुस्त करावे, संत्रा मोसंबी या पिकाचे अनुदानित वितरित करावे, या बाबींचा समवेश होता.

सर्व प्रथम उपस्थित सर्वांनी पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करून घडल्याचा निषेध व्यक्त केला.

तहसील कार्यालयाकडे जाताना माजी आमदार वीरेंद्र जगताप सह काँग्रेस कार्यकर्ते 

त्यानंतर सदरच्या विषयाच्या निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. तसेच याबाबत सबंधित विभागाने ठोस पाऊल न उचल्यास १५ मे नंतर तहसिल कार्यालयाच्या आत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी दिला.

तहसीलदार अभय घोरपडे याना निवेदन सादर करताना

              यावेळी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष पंकज वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मुंदडा, बँक चे संचालक श्रीकांत गावंडे, नितीन कनोजिया, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शिंदे, मंगेश बोबडे, मुकेश राठी, डॉ भगवान शिंदे, सुनील भोगे, संजय गाडे, राजू पुरोहित, रुपेश गुलहाने, ऋषी जगताप, अविनाश इंगळे, विपिन ठाकरे, मुकींदा माहोरे, बंटी भोंगे, अमोल भेंडे, राजीव भोगे, प्रशांत वानखडे, विनोद तायडे, सलिम पठाण, शिशिर शेंडे, अवीनाश मांडवगणे, यशवंतराव बोरकर, राजेश आठवले, गणेश धवने, दिनकरराव जगताप, अमोल कडू, संजय सावंत, नंदकुमार मानकर, नितीन देशमुख, विलास धांडे, सचिन रामगावकर, प्रशांत भेंडे, सुरेश रामगुंडे, संजय गोपाळ, मनोज तायडे, संजय इंगळे, रितेश निस्ताने, लोकेश शेंडे, प्रमोद राऊत, संजय गाडे, शुभम तरोणे, वैभव पावडे, शैलेश निस्ताने, सलीम पठाण, दिवाकर भेंडे, संदीप भोकरे, संजय निमकर, प्रमोद चौधरी, वैभव पावडे, प्रवीण खोंडे, प्रकाश इंगोले, नंदकिशोर राठी, अतुल इंगोले, मगन नगराची, रमाकांत इंगोले, प्रवीण राठी, प्रफुल चौधरी, राजाभाऊ गायकवाड, किरण ठोंबरे, रवींद्र डबले, अशोक बोदिले, रोफ भाई, प्रफुल चौधरी, माधुरी ताई दूधे,संजय मोकाती, गोपाल मांडवकर, पवन खुरपडे, डॉ प्रमोद रोंघे, विनोद राऊत मोरेश्वर गायके, राजेंद्र ढेरे, सौरभ भिसे, विनोद गायके, प्रफुल कडू, सह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!