धामणगाव रेल्वे राजकीय

धामणगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीवर महिला राज ; ६२ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या गावनेत्यांचे स्वप्न भंगले

धामणगाव रेल्वे 

तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक करिता ६२ ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे आरक्षण आज दि. २४ एप्रिल रोजी तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे जाहीर झाले आहे. तब्बल ३२ जागेवर महिलाराज पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती करिता ८, अनुसूचित जमाती करिता ४, ना.मा. प्र. करिता १५ जागा राखीव ठेवण्यात आले असून उर्वरित तर ३५ ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे.
अनुसूचित जाती मध्ये झाडा, चिंचोली, आष्टा, गव्हा फरकाडे, हिरपूर, अशोक नगर, दाभाडा, काशीखेड या ८  गावाचा समावेश असून
महिलाकरिता काशीखेड, अशोकनगर, हिरपूर, गव्हा फरकाडे, या ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आलेल्या.
अनुसूचित जमाती करिता कळाशी, कामनापूर घुसडी, नायगाव, वरुड बगाजी या ४ गावांचा समावेश असून
महिलाकरिता नायगाव आणि वरुड बगाजी येथील ग्रामपंचायती राखीव आहे.
ना मा प्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बोरगाव धांदे, सोनेगाव खर्डा, झाडगाव, तळेगाव दशासर, जळगाव आर्वी, वाटोळा बुद्रुक, वाकनाथ, निंबोली, निंभोरा राज, आजनगाव, विटाळा अंजनवती, तरोडा बोरवघळ, गुंजी या १५ गावांचा समावेश असून
महिलाकरिता जळगाव आर्वी, वाटोळा बुद्रुक, वकनाथ, निंबोली, निंभोरा राज, नायगाव, अंजनवती, गुंजी ही ८ ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आली आहे.

तसेच उर्वरित ३५ ग्रामपंचायतीवर

खुल्या प्रवर्गासाठी ( सर्वसाधारण ) जागा राखीव आहे. ज्यामध्ये वडगाव राजदी, ढाकुलगाव, गव्हा निपाणी, मंगरूळ दस्तगीर, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, कावली, वसाड, जळगाव मंगरूळ, चिंचपूर, शिदोडी, दिघी महल्ले, पिंपळकुटा, निंभोरा बोडखा, रायपूर, तळणी, गिरोली, वाघोली, वाढोणा, मलातपुर, आसेगाव, शेंदूरजना खुर्द, तिवरा, नारगावंडी, सावळा, जळकापटाचे, जुना धामणगाव, विरूळ रोंघे, अंजनसिंगी, पेठ रघुनाथपूर, देवगाव, उसळगव्हाण, भातकुली, कासारखेड, हिंगणगाव या गावांचा समावेश असून
महिलाकरिता ढाकुलगाव, गव्हानिपाणी, मंगरूळ दस्तगीर, गोकुळसरा, दिघी महल्ले, पिंपळखुटा, निंभोरा बोडका, रायपूर, वाघोली, वाढोणा, मलातपुर, आसेगाव, नारगावंडी अंजनसिंगी, भातकुली, उसळगव्हाण, विरळ रोंघे, हिंगणगाव ही गावे सर्वसाधारण आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.

सदरच्या जाहीर झालेल्या सरपंच आरक्षणामुळे ” कभी खुशी कभी गम” अशी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या गाव नेत्यांचे स्वप्न मात्र यानिमित्ताने भंगले आहे. तर अनेकांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!