हटके

पत्नीचे प्रियकरांसोबत लग्न लावून देणारा नवरा, चार दिवसांतच पोहोचला तिच्या सासरच्या दारात

“मला माझी पत्नी परत दे” नवऱ्याची पत्नीच्या प्रियकराला विनवणी

जनसूर्या मीडिया : लखनऊ

सध्या उत्तर प्रदेशात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी किंवा अन्य अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित होत आहे. ज्या घटना घडत आहेत, त्याची सर्वत्र चर्चा सुद्धा होत आहे.
अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर येथे घडली, ज्याची सर्वत्र तर चर्चा झालीच, पण त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. संत कबीरनगरमध्ये नवऱ्याने त्याच्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिले. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ज्यानंतर या पतीचे कौतुक करण्यात आले. पण पत्नीच्या लग्नाच्या चार दिवसांमध्येच हा पती तिच्या सासरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमधील धनघटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात राधिका, बबलू आणि त्यांची दोन मुले राहण्यास आहेत. पण मागील आठवड्यातच या बबलूनेत त्याच्या पत्नीचे लग्न तिचा प्रियकर विकाससोबत लावून दिले. यावेळी गावातील अनेक लोक त्याठिकाणी उपस्थित होती. यानंतर राधिका आपल्या दोन मुलांना बबलूकडे सोडून विकाससोबत निघून गेली. त्यामुळे गावातच नव्हे, जिल्ह्यातच नव्हे तर सोशल मीडियामुळे संपूर्ण देशभरात हे लग्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले. पण आता चार दिवसांनंतर लगेचच या प्रकरणाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. कारण पत्नीचे लग्न लावून चार दिवस उलटत नाही तर लगेचच बबलू राधिकाच्या म्हणजेच पूर्वाश्रमीच्या बायकोच्या सासरी पोहोचला आहे.
बबलू पत्नीला परत आणण्यासाठी २८ मार्चला विकासच्या घरी पोहोचला. यावेळी बबलूने विकासला “मला माझी पत्नी परत दे” अशी विनंती केली. ज्यानंतर याबाबत राधिका, बबलू आणि विकास या तिघांमध्येही मोठी चर्चा झाली. राधिका निघून गेल्यानंतर दोन मुलांना सांभाळणे कठीण होत असल्याचे कारण सांगितले. तर यावेळी बबलूने माफी सुद्धा मागितली. यावेळी या तिघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर विकासने राधिकाला बबलूसोबत जाण्याची परवानगी दिली. पण याबाबत विकासची आई म्हणाली की, आम्ही आधीपासूनच या लग्नाच्या विरोधात होतो. पण लोकांनी जबरदस्तीने लग्न लावले.
राधिका आणि बबलू यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. दोघांना दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी बबलू मजुरीसाठी परराज्यात गेला. त्या कालावधीत त्याची पत्नी राधिकाचे गावातल्याच विकासशी सूत जुळले. याचा सुगावा बबलूला लागला. त्याने वाद घालण्याऐवजी स्वत:चे राधिकाला विकासच्या हवाली केले आणि दोघांचे लग्न लावून दिले. पण आता विकासला सोडून बबलूसोबत माघारी आल्यानंतर राधिका जिल्ह्यातच अन्यत्र राहत आहे. अशी माहिती विकासच्या आईने दिली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!